मोकळा…
आउट ऑफ द वे जाऊन मदत करणे, एखाद्याला सहकार्य करणे ही गोष्टं वाईट नाही. पण काहीवेळा त्याचे होणारे परिणाम मात्रं फार भीषण असतात. आपण केलेली मदत ही फक्तं आपल्या आणि ज्याला केलीये त्याच्या दृष्टीतून नैतिक ठरते, बाकीच्यांना तुम्ही जेवढं जोरात ओरडून सांगाल तेवढं ते खोटं ठरतं. एखादी घटना अशी घडते की आयुष्याचा अर्थच बदलून जातो. उरलेल्या आयुष्यात एक सल, क्वचित डाग घेऊन जगणंसुद्धा नशिबी येतं. इलेक्ट्रोनिक मिडिया जसं अतिरंजित बातम्या देऊन एखाद्याला आयुष्यातून उठवतात तसं काहीवेळेस होतं. मी सांगणार आहे ते कधीच घडून गेलंय. तीसेक वर्ष निश्चित झाली. जुनं का उकरायचं खरंतर, पण गरजेचं आहे, कुणाच्या तरी बाबतीत असं घडू नये म्हणून.
माझी मैत्रीण होती एक. एका हिलस्टेशनला
तिचे बाबा म्यानेजर होते राष्ट्रीयकृत बँकेत पस्तीस वर्षापूर्वी. तेंव्हा
काय गर्दी असणार बँकेत तिथे. सगळा गाव ओळखीचा होता. तीन मुली, घरात
चारचाकी, पुण्यात प्लॉट. सगळं कसं छान चाललं होतं. माणूस सज्जन,
कुटुंबवत्सल. पस्तीस वर्षापूर्वी बँकेत व्यवहार फार नसायचे, सेव्हिंग खातीच
जास्ती. तर त्यांचा एक मित्रं होता गावात. तो ही प्रामाणिक. त्याला पैसे
लागत होते अर्जंट. त्यानी लोन मागितलं. सगळी प्रोसेस व्हायला पंधरा वीस
दिवस जाणार. पैसे तर लगेच हवे होते. गोल्डलोन हाच एकमेव मार्ग होता लगेच
पैसे मिळण्याचा. बँकेचा सोनार असतोच, तो ही गावातलाच ओळखीचा होता. आउट ऑफ द वे जाऊन मदत करणे, एखाद्याला सहकार्य करणे ही गोष्टं वाईट नाही. पण काहीवेळा त्याचे होणारे परिणाम मात्रं फार भीषण असतात. आपण केलेली मदत ही फक्तं आपल्या आणि ज्याला केलीये त्याच्या दृष्टीतून नैतिक ठरते, बाकीच्यांना तुम्ही जेवढं जोरात ओरडून सांगाल तेवढं ते खोटं ठरतं. एखादी घटना अशी घडते की आयुष्याचा अर्थच बदलून जातो. उरलेल्या आयुष्यात एक सल, क्वचित डाग घेऊन जगणंसुद्धा नशिबी येतं. इलेक्ट्रोनिक मिडिया जसं अतिरंजित बातम्या देऊन एखाद्याला आयुष्यातून उठवतात तसं काहीवेळेस होतं. मी सांगणार आहे ते कधीच घडून गेलंय. तीसेक वर्ष निश्चित झाली. जुनं का उकरायचं खरंतर, पण गरजेचं आहे, कुणाच्या तरी बाबतीत असं घडू नये म्हणून.
नंतर तुम्ही आता काहीही बोला,
अक्कल पाजळा, त्यांचं काय चुकलं, त्यांनी काय करायला हवं होतं, उपयोग
शून्यं. घडलं ते घडलं. सदहेतूनी केलेल्या गोष्टीचं फळ त्यांना मिळालं नाही
एवढंच खरं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना समजून घेतलं आणि दोष दिला नाही हा
नशिबाचा भाग. हल्ली हजारो कोटीच्या बँका बुडवून झाल्या की पेपरात नाव येतं
हल्ली, फलाणा माणूस कसा आणि किती काळ फरार आहे, ही बातमी असते. पस्तीस
वर्षापूर्वी असं काही नव्हतं यात त्यांचा काही दोष नाही.
काय
वाटत असेल त्यांना नेमकं. मला वाटतं, एकदा त्यांना कुणीतरी मुद्दाम
विचारावं, कुरापत काढल्यासारखं. असे चिडतील की सगळं ओकतील, शिव्या देतील,
रडतील. होऊन जाऊ दे एकदा. माणूस मोकळा होईल. अचानक गप्पं झालेला, स्वत:वर
चिडलेला माणूस एकदा मोकळा झालाच पाहिजे. काय म्हणता?
जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment