मोठेपणी कोण होणार?.....
आपण जन्माला येतो तेंव्हा काही माहित नसतं आपण पुढे कोण होणार ते. हाक मारायला बरं म्हणून आपलं नाव ठेवतात. मग ते आपल्याला चिकटतं ते कायमचंच. ते पुढं मोठं होतं की नाही ते आपल्या बुद्धीवर, मिळणा-या संधीवर, लायकीवर, कर्तुत्वावर अवलंबून असतं. लहानपणापासून आपले कुणी न कुणी वयपरत्वे आदर्श असतात. फार काळ प्रभाव टिकेल असं कुणी नसतं खरंतर पण आपल्याला अमक्या ढमक्या सारखं वागायची, रहायची सुरसुरी येते आणि आपण कळत नकळत अनुकरण करतो. आपण काय वाचतो, बघतो त्याप्रमाणे हंगामी विचार मनात रुजतो आणि नाहीसा पण होतो. माझ्या मनात तर नेते स्टेटमेंट नाकारायला जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा फास्ट बदल घडतात.
आपण जन्माला येतो तेंव्हा काही माहित नसतं आपण पुढे कोण होणार ते. हाक मारायला बरं म्हणून आपलं नाव ठेवतात. मग ते आपल्याला चिकटतं ते कायमचंच. ते पुढं मोठं होतं की नाही ते आपल्या बुद्धीवर, मिळणा-या संधीवर, लायकीवर, कर्तुत्वावर अवलंबून असतं. लहानपणापासून आपले कुणी न कुणी वयपरत्वे आदर्श असतात. फार काळ प्रभाव टिकेल असं कुणी नसतं खरंतर पण आपल्याला अमक्या ढमक्या सारखं वागायची, रहायची सुरसुरी येते आणि आपण कळत नकळत अनुकरण करतो. आपण काय वाचतो, बघतो त्याप्रमाणे हंगामी विचार मनात रुजतो आणि नाहीसा पण होतो. माझ्या मनात तर नेते स्टेटमेंट नाकारायला जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा फास्ट बदल घडतात.
लहानपणी कुणाचं तरी चरित्रं वाचलं आणि ठरवलं, आपल्यालाही या माणसासारखं मोठं व्हायचंय. काय करता येईल? त्यांनी जे जे केलं ते आपण करायचं म्हणजे नाव होईल असा माझा समज. 'ते' दिवे नसल्यामुळे कंदिलात अभ्यास करायचे असं होतं त्यात. मी मुळात लहानपणापासून स्वयंघोषित हुशार आहे. हे मी सोडून कुणालाही आजतागायत पटलेलं नाही हा भाग वेगळा. माळ्यावरून मी कंदील काढला कुणाला समजू न देता. दिवसभर काहीही अभ्यास केला नाही, अंधार पडायची वाट बघितली. आईनी लाईट लावला आणि कुठेतरी बाहेर गेली. मी आधीच पुसून ठेवलेला कंदील काढला, त्यात रॉकेल घातलं, वात वर काढून कात्रीनी कापली, अजून थोडी वर घेण्याच्या नादात ती त्या खाचेतून बाहेर आली आणि रॉकेल सांडलं. तरीही मी तिला परत आत घालून सेट केलं. काच व्यवस्थित बसवून वात मोठी केली आणि लाईट घालवला. सवय नसल्यामुळे काहीही दिसत नव्हतं पुस्तकातलं. म्हणून वात मोठी केली तर कंदील भगभगला आणि वर काच काळी व्हायला लागली.
मी सर्वस्वं गमावल्यासारखा, एके हंगल पेक्षा पडलेला चेहरा घेऊन परत एकटा मैदानावर गेलो. त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. गेल्या गेल्या सगळ्यांनी कानफटवून झालं, शरीराच्या शक्यतो सगळ्या अवयवांचा वाक्यात उपयोग करून झाला, तीन तास उन्हातान्हात फिल्डिंग करून घेतली. थिअरी शिकलो पण कर्णासारखा आयत्यावेळी महत्वाचा मुद्दा विसरलो, "दुश्मन के अड्डे पर कभी अकेले नही जानेका". लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. ब्याट मिळाली पण स्वप्नं धुळीला मिळालं, त्यामुळे आत्मविश्वास पार दो गज जमीन के नीचे गेला. मी काय म्हणतो, गेला बाजार राजनसारखं इंडोनेशियातून नसतं आणलं अगदी मला पण नेपाळ बॉर्डर, गोव्यातल्या एखाद्या बोटीवरून, काहीच नाही तर निदान तळजाईच्या टेकाडावरल्या एखाद्या झुडपातून तरी उचलून आणलाच असता की. स्वप्नं बघणं आपल्या हातात असतं पूर्ण होऊ देणं, न देणं त्याच्या हातात असतं म्हणा.
जयंत विद्वांस