Saturday 11 October 2014

प्रकाश बाबा आमटे.....


प्रकाश बाबा आमटे..... 

आजच्या काळात असा सिनेमा काढतात? समृद्धी पोरे वेड्या आहेत किंवा पैसे कुठे खर्च करावेत असा प्रश्नं असावा.पुढची यादी वाचा कळेल त्यात काय काय नाहीये ते - व्हिलन नाही, बागेतली गाणी, आयटम सौंग नाहीत. नानाचे जबरा डायलॉग नाहीत, पुढे काय घडणार याची उत्सुकता नाही, कौमेडी नाही, लोकेशन्स नाहीत, मोठाले बंगले, गाड्या, देखण्या बायका नाहीत.

जे आहे ते मात्रं अंगावर येतं. एक प्रार्थना आहे, साधा नाना आणि सोनाली आहे, आदिवासी आहेत, त्यांचे आजार आहेत, हताश परिस्थिती आहे, कल्पनेच्या बाहेरची संकट आहेत, अंगावर काटा आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारी वस्तुस्थिती आहे. आपल्या खुजेपणाची, क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारी क्वचितच घडू शकणारी सत्यकथा आहे.

असो! या सिनेमाचे परिक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही, तेवढा वकूबही नाही. दिवसेंदिवस समाजातील आदर्श कमी होत असताना असे सिनेमे पाहिले की दिलासा मिळतो. अव्यक्तं, निरपेक्ष प्रेम दुर्मिळ झालंय त्यामुळे हेमलकसाला वीज नाही म्हटल्यावर वीस वर्ष साधना ताईंनी तिकडे पंखा लावला नाही हे ऐकल्यावर, मुलाकडे लक्ष ठेवा, येताना एक लेकरू रस्त्यात गेलं त्याला पुरून येते हे ऐकल्यावर क्षणभर पडद्यावरील चित्रं दिसेनासं झालं. 

मोजून १०० लोक असतील बघायला. वाईट वाटलं. लोकांना चिरडणा-या, लायकीशिवाय पद्मश्री मिळणा-या हिरोंचे सिनेमे पहिल्या दिवशी जेवढा गल्ला जमवतात तेवढा सुद्धा एकूण धंदा होणार नाही कदाचित. पण लायकीमुळे पद्मश्री, रेमन मगसेसे मिळालेल्या या रिअल हिरोला पदरमोड करून पहायला हरकत नाही. तेवढं देणं आपण निश्चितच लागतो त्यांचं. 
जयंत विद्वांस 





2 comments:

  1. सहमत... तुमची ही पोस्ट Whats App वर फिरतेय, आज शोध घेतला आणि तुमचा ब्लॉग सापडला :) :)

    ReplyDelete
  2. प्रकाश बाबा आमटे.....

    आजच्या काळात असा सिनेमा काढतात? समृद्धी पोरे वेड्या आहेत किंवा पैसे कुठे खर्च करावेत असा प्रश्नं असावा.पुढची यादी वाचा कळेल त्यात काय काय नाहीये ते - व्हिलन नाही, बागेतली गाणी, आयटम सौंग नाहीत. नानाचे जबरा डायलॉग नाहीत, पुढे काय घडणार याची उत्सुकता नाही, कौमेडी नाही, लोकेशन्स नाहीत, मोठाले बंगले, गाड्या, देखण्या बायका नाहीत.

    जे आहे ते मात्रं अंगावर येतं. एक प्रार्थना आहे, साधा नाना आणि सोनाली आहे, आदिवासी आहेत, त्यांचे आजार आहेत, हताश परिस्थिती आहे, कल्पनेच्या बाहेरची संकट आहेत, अंगावर काटा आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारी वस्तुस्थिती आहे. आपल्या खुजेपणाची, क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारी क्वचितच घडू शकणारी सत्यकथा आहे.

    असो! या सिनेमाचे परिक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही, तेवढा वकूबही नाही. दिवसेंदिवस समाजातील आदर्श कमी होत असताना असे सिनेमे पाहिले की दिलासा मिळतो. अव्यक्तं, निरपेक्ष प्रेम दुर्मिळ झालंय त्यामुळे हेमलकसाला वीज नाही म्हटल्यावर वीस वर्ष साधना ताईंनी तिकडे पंखा लावला नाही हे ऐकल्यावर, मुलाकडे लक्ष ठेवा, येताना एक लेकरू रस्त्यात गेलं त्याला पुरून येते हे ऐकल्यावर क्षणभर पडद्यावरील चित्रं दिसेनासं झालं.

    मोजून १०० लोक असतील बघायला. वाईट वाटलं. लोकांना चिरडणा-या, लायकीशिवाय पद्मश्री मिळणा-या हिरोंचे सिनेमे पहिल्या दिवशी जेवढा गल्ला जमवतात तेवढा सुद्धा एकूण धंदा होणार नाही कदाचित. पण लायकीमुळे पद्मश्री, रेमन मगसेसे मिळालेल्या या रिअल हिरोला पदरमोड करून पहायला हरकत नाही. तेवढं देणं आपण निश्चितच लागतो त्यांचं.
    डॉ.प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, आपण कुटुंबासह�जरुर पहावा. या चित्रपटापासुनचा निधी आदिवासींकरीता हेमलकसा प्रकल्पास देण्यात येणार आहे.(कृपया हा मेसेज आपल्या माणसांना पाठवा

    ReplyDelete