वेस्टइंडीजचा सुवर्णकाळ
संपला ही क्रिकेटच्या दृष्टीने फार वाईट घटना होती, आहे, राहील. एकदम
दिलदार प्रतिस्पर्धी. त्यांना हरवल्यावर आपण काही तरी कमावलं अशी भावना
जेत्याच्या मनात निर्माण करणारा. थोरले रावसाहेब गेल्यावर त्यांच्या
समृद्धीची, दरा-याची पुसटशी आठवण त्यांच्या वारसात अधून मधून व्हावी आणि
त्यावरच आपण समाधान मानावं अशी त्यांची दुरावस्था झाली. लारा, हूपर,
अम्ब्रोस, वाल्श आणि इतर यांनी त्यांच्या परीनी बुडती बोट काही काळ सावरली.
पुढचा वारस तोडीचा नसेल तर मग अवघड होतं. मरेच्या जागी दुजा फिट होता
त्यानंतर थोडा फार रिडली जेकब सोडला तर त्यांचा विकेटकिपर आठवावा लागेल.
मुळात त्यांचे आग ओकणारे भन्नाट गोलंदाज दुष्काळ पडावा तसे गायब झाले.
अम्ब्रोस आणि वाल्श ही शेवटची भन्नाट जोडगोळी होती. वाल्श आधी लेगस्पिन टाकायचा आणि कुंबळे मध्यमगती. कोचच्या सांगण्यावरून वाल्शनी फास्ट टाकायला सुरवात केली आणि कुंबळेने लेगस्पिन. त्यामुळे वाल्शचा लेगकटर इतरांपेक्षा घातक होता तर कुंबळेचा लेगस्पिन टर्नपेक्षा वेगवान होता. मनगटात ताकद असली की, आत्मविश्वास असला की लोक मनगटाच्या पुढचा भाग ज्योतिषापुढे पसरून बसत नाहीत.
इंग्लंडमधे इंग्लंड विरुद्ध सामना चालू होता. विंडीज
हरणार हे कन्फर्म होतं. बहुतेक रिची रिचर्डसन कप्तान होता. चौथ्या दिवशीच
डावानी हरायची नामुष्की समोर होती. अतीव करुणेतून उत्तम विनोद, उपहास
निर्माण होत असावा. रिचर्डसननी अम्ब्रोसला विचारलं, कितीचा लिड मिळाला तर
आपण इंग्लंडला हरवू शकू? ब्याट्समन बीट झाल्यावर क्वचित त्याच्याकडे बघून
तो "वाचलास लेका" अशा अर्थाचं स्मित करायचा. त्याची ब्याटिंग मात्रं विनोदी
असायची. अम्ब्रोसनी एकंच शब्दं सांगितला "शंभर". संपताना १०५ चा लिड देऊन
विंडीज संघ बाद झाला. अम्ब्रोस आणि वाल्श ही शेवटची भन्नाट जोडगोळी होती. वाल्श आधी लेगस्पिन टाकायचा आणि कुंबळे मध्यमगती. कोचच्या सांगण्यावरून वाल्शनी फास्ट टाकायला सुरवात केली आणि कुंबळेने लेगस्पिन. त्यामुळे वाल्शचा लेगकटर इतरांपेक्षा घातक होता तर कुंबळेचा लेगस्पिन टर्नपेक्षा वेगवान होता. मनगटात ताकद असली की, आत्मविश्वास असला की लोक मनगटाच्या पुढचा भाग ज्योतिषापुढे पसरून बसत नाहीत.
जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment