परवा तुला ट्याण्डम गाण्यांबद्दल बोललो होतो ना त्यातलंच एक 'छोटीसी ये दुनिया…'. चित्रपट : किशोर, वैजयंतीमालाचा 'रंगोली', गायक- किशोर, लता, गीत-शैलेंद्र, संगीतकार - शंकर-जयकिशन. ही नामावली झाली फक्तं. शाळेत इतिहासात असलेल्या सनावलीमधे जसे डिटेल्स असायचे फक्तं, इतिहास नसायचा तशी. (अर्थात म्हणून मला मार्क्स काही जास्ती नसते मिळाले म्हणा). :)
हा सिनेमा मी काही पाहिलेला नाहीये. गाणंही फक्तं किशोरचच बघितलंय,
लताचं ऐकलंय. ह्या गाण्याचा किस्सा मी वाचला होता त्यामुळे हे गाणं जास्तं
लक्षात राहिलंय. शैलेंद्र आणि शंकर जयकिशनचं भांडण झालं एकदा. सरळ साध्या
शैलेंद्रला राग आला खूप. तो व्यक्तं व्हायला पाहिजे, समोरच्याला समजायला
पाहिजे यासाठी त्यानी सभ्यपणे शंकर जयकिशनला चिठ्ठी ठेवली. त्यात त्यानी
लिहिलं होतं-'छोटीसी ये दुनिया, पहचाने रास्ते है, कभी तो मिलोगे, कही तो
मिलोगे तो पूछेंगे हाल'. आर.के.शिवाय बाहेरही ते जोडीने काम करायचे त्याचा
संदर्भ त्या निरोपात होता.
शंकर जयकिशन पण वल्लीच. चिठ्ठी वाचून म्हणाले, अरे ये तो मुखडा है, अच्छी धून बन सकती है. त्यांनी मुखड्याला चाल लावून ठेवली, पुढे शैलेंद्र कडून ते गाणं पूर्ण करून घेतलं आणि 'रंगोली' मधे वापरलं. कलाकारांचे रुसवे फुगवे पण किती वेगळे असतात ना. म्हणून कदाचित भांडण केलं की आपण कचाकचा बोलतो किंवा अबोला धरतो, मनस्वी लोक असं लिहितात. अजून एक गंमत वाच खाली दिलीये ती अशाच एका हिट संवादाची आणि नंतर गीतात रुपांतर झालेली -
आनंद बक्षी - 'अच्छा तो हम चलते है'
शंकर जयकिशन पण वल्लीच. चिठ्ठी वाचून म्हणाले, अरे ये तो मुखडा है, अच्छी धून बन सकती है. त्यांनी मुखड्याला चाल लावून ठेवली, पुढे शैलेंद्र कडून ते गाणं पूर्ण करून घेतलं आणि 'रंगोली' मधे वापरलं. कलाकारांचे रुसवे फुगवे पण किती वेगळे असतात ना. म्हणून कदाचित भांडण केलं की आपण कचाकचा बोलतो किंवा अबोला धरतो, मनस्वी लोक असं लिहितात. अजून एक गंमत वाच खाली दिलीये ती अशाच एका हिट संवादाची आणि नंतर गीतात रुपांतर झालेली -
आनंद बक्षी - 'अच्छा तो हम चलते है'
लक्ष्मीकांत - 'फिर कब मिलोगे'
आनंद बक्षी - 'जब तुम कहोगे'
शैलेंद्र नेहमीच साधं लिहायचा, मनातलं लिहायचा. लताचं गाणं स्लो आहे
म्हणजे ते सिनेमात दु:खी असणार. किशोरचं दुसरं कडवं लताच्या गाण्यात पहिलं
आहे आणि तिचं दुसरं वेगळं आहे. किशोरच्या गाण्यात मिश्कीलपणा आहे, प्रेमात
पडलेल्या माणसाचा चिवटपणा आहे. एकीकडे तो तिला पाषाणहृदयी म्हणतो आणि
लगेच माझ्यासारखा दुसरा कुणी मिळणार नाही हे ही सांगतो. पुरुषाला जरा
कमीपणा घ्यायला त्रासाचं होतं पण. एकीकडे म्हणतो माझ्या मनाला प्रेमात धीर
धरायची सवय आहे (आधी एकदा कुणीतरी हाकललेलं दिसतंय) आणि उपमा काय तर तावून
सुलाखून निघालेलं शंभर नंबरी सोनं म्हणजे मी. येडे, ही संधी हातची दवडू
नकोस, अशी मनाची श्रीमंती लाथाडू नकोस. आणि दुर्दम्यं आशावाद आहे तो
वेगळाच, ज्या तो-यात आज जातीयेस तशीच एक दिवस परत येशील.
लताच्या आवाजात जरा दु:खी स्वर आहे. स्त्रीचं पहिलं प्रेम तेच शेवटचं
असायचं तेंव्हा लिहिलंय शैलेन्द्रनी हे. त्यामुळे कदाचित ते कालबाह्य वाटू
शकेल अशी परिस्थिती आहे आता. लता म्हणते माझं हे आयुष्यातलं पहिलंच आणि शेवटचं प्रेम आहे. मनाचं नातं एकदाच जोडलं जातं. खरं आहे.
चल, शैलेन्द्रचे शब्द म्हणतो 'छोटीसी ये दुनिया, पहचाने रास्ते है, कभी मिलोगे तो ऐसेही गानोंकी बाते करेंगे' तबतक दसविदानिया.
जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment